मित्र भेटले, थकवा आला किंवा औपचारिक भेट घ्यायची असल्यास आपल्याला हमखास आठवतो तो चहा. कारण कुठलं ही असो चहा आपल्याला नेहमीच साथ देतो. हाच चहा वेळेला ताजा आणि उत्कृष्ट चवीचा मिळाला तर मन सुखावून जातं. आज जगोजागी चहाचे अमृततुल्य आहे. परंतु ताजा चहा मिळणे तेवढेचं अवघड.
तुमची चहाची तृप्ती शमविण्यासाठी अहमदनगरमधील “चाय स्पॉट” - महाराष्ट्राचा चार्जिंग पॉईंट म्हणून प्रसिध्द होतोय....सकाळचा नाश्ता असो वा दुपारचे जेवण किंवा संध्याकाळी मित्रांसोबत केलेला कल्ला सगळ्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे “चाय स्पॉट”.
येथील अमृततुल्य चहाने तुम्ही रीर्फेश तर होताच शिवाय तेथील प्रसन्न वातावरण देखील हवहवंस वाटतं. ग्राहकांचे समाधान हीच आमच्या कामाची पावती आहे.
उत्तम चवीचा चहा -
मिनरल पाणी, सात्विक दुध, उत्तम दर्जाची चहापत्ती आणि सुंठ, वेलदोडे, दालचिनी, लवंग इ. नैसर्गिक पदार्थ वापरून आम्ही स्वतः तयार केलेला चहाचा मसाला, या सर्वांचं योग्य प्रमाण वापरून आम्ही उत्तम चहा ग्राहकांना देतो. त्यामुळे प्रत्येकवेळी ग्राहकाला एकसारख्या चवीचा चहा मिळतो, तो घेतल्यानंतरचा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं.
स्वच्छता आणि नीटनेटकेपणा –
आम्ही प्रत्येक आऊटलेटमध्ये स्वच्छतेवर जास्त लक्ष केंद्रीत करतो. चहा घेतांना प्रत्येक ग्राहकाला फ्रेश व उत्साही वाटेल असे वातावरण नेहमी आपल्या चाय स्पॉट अमृततुल्यमध्ये असावं यासाठी आम्ही आग्रही असतो.
कामगारांना प्रशिक्षण –
ग्राहकांसोबत कसा संवाद साधावा?, त्यांचा वेळ वाया न जाता त्वरीत सेवा कशी उपलब्ध करावी?, चहाची चवीचा दर्जा कसा राखावा? अशा प्रकारचे प्रशिक्षण आम्ही कामगारांना देतो. जेणेकरून ग्राहक नेहमी चाय स्पॉट अमृततुल्यला येण्यास पसंती देतात.